अक्कलकोट

अक्कलकोट भाजपचे महावितरण कार्यालयास टाळे ठोको आंदोलन.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –

महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना जोड तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या कामाच्या निषेधार्थ अक्कलकोट शहर व तालुका भाजपच्या वतीने आज आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले.सोलापूर बायपास रस्त्यावर महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, प्रभाकर मजगे, अप्पासाहेब पाटील, अप्पासाहेब बिराजदार, राजेंद्र बंदीछोडे, खय्युम पिरजादे, गुंडप्पा पोमाजी, राजशेखर मसुती, शिवशरण वाले, यशवंत धोंगडे, मिलन कल्याणशेट्टी, अप्पू परमशेट्टी, अप्पू कौटगी, श्रीशैल नंदर्गी, परमेश्वर यादवाड, महेश हिडोंळे, दयानंद बिडवे, रमेश कापसे, श्रीशैल ठोंबरे,सुरेखा होळीकट्टी, बाळा शिंदे, नागराज कुंभार, दयानंद बमनळी, प्रदिप पाटील, शंकर उणदे, धोंडप्पा बनसोडे, स्वामीनाथ घोडके, सुधीर मचाले,

अविनाश पोतदार, विनोद मोरे, सुनिल गवंडी, सचिन पवार, कांतू धनशेट्टी, बबलू कामनुरकर, छोटू पवार, अंबण्णा चौगुले, आलम कोरबू, परमेश्वर झळकी, सोन्या बापू शिंदे, गेनसिध्द पाटील, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, सुनिल सावंत, इरण्णा, बिराजदार, सोमनाथ पाटील, विशाल उडचाण,प्रदीप जगताप, सुनील सावंत, शिवप्पा हिळ्ळी, संतोष आळगी, भिमा तोरणगी, दिपक जरीपटके, स्वामीनाथ घोडके, शिवशंकर स्वामी, संकेत कुलकर्णी, राहूल वाडे, लखन झंपले, आणप्पा बिराजदार आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले की अक्कलकोट तालुका हा सतत कमी पावसाच्या दुष्काळ सदृश पट्यात येतो.या ठिकाणचा शेतकरी हा कष्टकरी असूनही वेळीअवेळी निर्सगाच्या अवकृपेला बळी पडणारा आहे.त्यामुळे तो नेहमी कर्जाच्या खाईत लोटलेला असतो.यावर्षी कधी नव्हे तो चांगला पाऊस झाला आणि काही तरी पीक करून कर्जातून बाहेर यावे तर शासनाच्या वक्रदृष्टीने वीज बिल नाही भरले तरी कनेक्शन तोडण्याची नोटीस देण्यात येत आहे.ही मोहीम चुकीचे असून यातून त्वरित दिलासा देण्यात यावा आणि यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.हा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर यापेक्षा खूप मोठा आंदोलन येत्या काळात केला जाणार आहे.

Related posts