उस्मानाबाद 

लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करा भाजपची मागणी.

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद:-
लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील महाराष्ट्र विद्युत वितरणाच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.सदस्य.सुधीर आण्णा पाटील, प्र.का.सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, बालाजी कोरे, नगरसेवक योगेश जाधव, नगरसेवक दाजीआप्पा पवार, विनायक कुलकर्णी, गिरीश पानसरे,विनोद निंबाळकर, .सुनील पंगुडवाले, अतिक शेख, शरीफ शेख,श्रीराम मुंबरे तसेच शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts