उस्मानाबाद 

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा व वैयक्तिक शेतकऱ्यांनी विमा पोर्टलवर नुकसान झाल्याची तक्रार नोंदवण्याची जाचक अट्ट रद्द करावी – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील 13 लाख 11 हजार 420 पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा व वैयक्तिक शेतकऱ्यांनी विमा पोर्टलवर नुकसान झाल्याची तक्रार नोंदवण्याची जाचक अट्ट रद्द करावी अशी मागणी धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत केली.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हासह, औसा, निलंगा जि.लातुर व बार्शी जि.सोलापूर जिल्ह्यात जुलै-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले. यावर्षी या जिल्ह्यातील 14 लाख 53 हजार 540 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता पोटी शेतकरी, राज्यशासन व केंद्र शासनाने मिळुन 1112 कोटी प्रीमियम भरला आहे. जुलै-ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील क्षेत्र पाण्यात वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील वीजेची व्यवस्था कोलमडली त्यामुळे या शेती क्षेत्राची माहिती, वीज नसल्याने, स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा बंद पडल्यामुळे लाखो शेतकरी ऑनलाईन तक्रारी विमा पोर्टलवर नोंदवू शकले नाहीत. ही अट पंतप्रधान विमा योजनेत शेतकऱ्यांवर जाचक व अन्यायकारक आहे. त्यामुळे फक्त 1 लाख 43 हजार 120 शेतकऱ्यांना 104 कोटी विमा मिळाला. या अटीमुळे मतदारसंघातील 13 लाख 11 हजार 420 शेतकरी पीक विमा मिळण्यापासुन वंचित राहिले आहेत. ही अट प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या विमा कंपनीसाठी फायद्याची आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसान झालेल्या शेती क्षेत्राची तक्रार वैयक्तिक शेतकऱ्यांनी वीमा पोर्टलवर भरणे ही अट शेतकऱ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक व जाचक असल्याने ही अट कायमची या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतुन कायमची रद्द करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 13 लाख 11 हजार 420 पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा. तसेच पुढील पिक विमा सरकार मार्फत घेण्यात यावा. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहार द्व्यारे चर्चेत भाग घेऊन लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मागणी केली.

Related posts