कविता 

बंद वाचनालयातील पुस्तकाचे दुःख . . .

कोरोना महमरीमुळे
लॉक डाउन जाले
लॉक डाउनमुळे वाचनालय
बंद जाली।

वचनालयतील पुस्तके
एकमेकाकडे केविलवाने
बघून दुःख व्यक्त करू
लागली।

दररोज आपल्याला स्पर्श
करणारी,आपल्याला वचनारीओळखीची माणसे
का बरे येत नसावी?

आपल्याला कुशीत घेऊन
मायने शब्दावर हात फिरवनारी
प्रेम करणारी। ही

सर्व मंडळी गेली तरी कुठे?

कपटातील एका छोट्या
कपयातून आवाज आला
आठ महिन्यापासुन मी
धूळ खात पडलो आहे

माझी पाने जीर्ण-जीर्ण
होत चालली, चित्रे विरुन गेली
भाव भावना मरून गेल्या
कधी संपेल हा क्रूर काळ!

कधी येतील माणस मानसात
व आमच्या पवित्र वचनालयत
वाचतील साठवलेलभरतीय संस्कृतितिल अनमोलअमृतरूपी
ज्ञान!!

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.

Related posts